Winning entries could not be determined in this language pair.There were 4 entries submitted in this pair during the submission phase. Not enough votes were submitted by peers for a winning entry to be determined.Competition in this pair is now closed. |
५० वर्षांपूर्वी जेव्हा नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले त्या क्षणी जगभर विस्मय, अभिमान आणि आश्चर्याची भावना उचंबळून आली. या वृत्तपत्राने असे मत व्यक्त केले की “या दिवसापासून, मानव, त्याच्या मनाची जशी इच्छा असेल आणि त्याचे चातुर्य जशी योजना करेल त्याप्रमाणे या विश्वात कोठेही जाऊ शकेल...विविध ग्रहांवर, शक्य तितक्या लवकर, मानव आता नक्कीच जाईल.” पण तसे झाले नाही. चंद्रावर पाऊल ठेवणे हा एक अस्वाभाविक मार्ग होता, ही केवळ एक उद्दिष्टपूर्ती नव्हती तर ते अमेरिकेची असाधारण क्षमता दाखवण्याचे माध्यम होते. एकदा हे सिद्ध करून झाल्यावर, पुन्हा तेच करणे आवश्यक ठरले नाही. (आजपर्यंत) केवळ ५७१ लोक पृथ्वीच्या कक्षेत गेले आहेत आणि १९७२ पासून दे मॉईनपासून शिकागो जितक्या अंतरावर आहे त्यापेक्षा जास्त अंतरावर अवकाशात कोणीही गेलेले नाही. पुढची ५० वर्षे अतिशय वेगळी दिसतील. कमी होणारा खर्च, नवीन तंत्रज्ञाने, चीनी आणि भारतीय महत्त्वाकांक्षा, आणि उद्योजकांची नवीन पिढी यामुळे अवकाश विकासात नव्या युगाचा आरंभ होणार हे नक्की. त्यामध्ये नक्कीच श्रीमंतांसाठी अवकाश प्रवास आणि सर्वांसाठी अधिक चांगली दळणवळण नेटवर्क्स यांचा समावेश असेल; दीर्घकाळाचा विचार केला तर यामध्ये खनिजांच्या समुपयोजनाचा आणि अगदी मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीचासुद्धा समावेश होऊ शकतो. अवकाश म्हणजे केवळ शासनांसाठीच नव्हे तर कंपन्या आणि व्यक्तींसाठीसुद्धा पृथ्वीचाच एक वाढलेला भाग असलेली जागा बनेल. पण या वचनाची पूर्ती होण्यासाठी जगाला स्वर्गाचे – शांततेच्या काळात आणि वेळच पडली तर- युद्धाच्या काळात, अशा दोन्ही वेळांसाठी - नियमन करण्यासाठी एक कायदा व्यवस्था तयार करावी लागेल. आत्तापर्यंतचा अवकाश विकास पृथ्वीवर चालणारी कामे – विशेषत: प्रक्षेपणासाठी आणि नेव्हिगेशनसाठी उपग्रह दळणवळण सुकर करण्यावर लक्ष केंद्रित करून केला गेला होता. आता दोन गोष्टी बदलत आहेत, पहिली म्हणजे- भू-राजकारण मानवाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. २०३५ च्या सुमारास काही लोकांना चंद्रावर पाठवण्याचे नियोजन चीन करत आहे. अमेरिकन लोकांनी २०२४ च्या सुमारास चंद्रावर परत जावे अशी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची इच्छा आहे. कमी होणाऱ्या खर्चामुळे ही गोष्ट आता आधीपेक्षा जास्त परवडण्याजोगी झाली आहे. अपोलोसाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च झाले (आजच्या पैशांच्या हिशोबाने). आता तिकिटाचा खर्च काही दशअब्जापर्यंत आला आहे. [ … ] जिथे मानवता आपल्या बेड्या काढून टाकेल आणि आपली नियती पुन्हा शोधेल अशा मोहक वन्य पश्चिमेसारखी अवकाशाची प्रसिद्धी करणे चुकीचे आहे. अवकाशाचे वचन पूर्ण होण्यासाठी ते शासित करण्याची गरज आहे. पोलादी सळ्या आणि सोयाबीन यांच्या प्रादेशिक व्यापाराच्या नियमांबद्दलसुद्धा जिथे जगाचे एकमत होऊ शकत नाही, तिथे ही फारच मोठी मागणी वाटू शकते. पण तसे झाले नाही तर पृथ्वीच्या बाहेर पसरलेल्या सर्व गोष्टींचे अंतर्भूत सामर्थ्य समजण्यासाठी अजून ५० वर्षे लागतील आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अवकाशामुळे पृथ्वीच्या समस्यांमध्ये भर पडण्याची शक्यता निर्माण होईल. | Entry #27707 — Discuss 0 — Variant: Marathi
|
पन्नास वर्षांपूर्वी ज्या क्षणी नील आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल टाकले, तेव्हा जगभर सर्वत्र आश्चर्य, अभिमान आणि कुतूहल निर्माण झाले होते. या वर्तमानपत्राने तेव्हा असे मत मांडले होते की, “माणूस, आजपासून या संपूर्ण विश्वात त्याच्या मनाला येईल आणि त्याची कल्पनाशक्ती भरारी घेईल तिथे कुठेही जाऊ शकतो... इतर ग्रहांवर माणूस लवकरच निश्चितपणे पाऊल टाकेल.” पण नाही. चंद्रावर स्वारी हा एक अपवाद होता, तसे करणे हे त्यामागचे अंतिम उद्दिष्ट नव्हते तर जगाला अमेरिकेच्या अद्वितीय क्षमता दाखवून देण्याचा तो एक मार्ग होता. आणि, एकदा तसे करून झाल्यावर त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज पडली नाही. केवळ ५७१ लोक पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले आहेत आणि १९७२ पासून, शिकागोपासून डेस मॉइन्स जेवढ्या अंतरावर आहे तितकेही दूर कोणी अवकाशात गेलेले नाही. पुढची ५० वर्षे खूप वेगळी असतील. घटत्या किमती, नवीन तंत्रज्ञान, चीन आणि भारताच्या महत्त्वाकांक्षा आणि उद्योजकांच्या एका नव्या पिढीमुळे अवकाश विकासाच्या एका धाडसी काळाची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीमंतांसाठी पर्यटन आणि सर्वांसाठी चांगले कम्युनिकेशन नेटवर्क यांचा यात नक्की समावेश असेल आणि दीर्घ काळानंतर खनिजांचा वापर आणि अगदी मोठ्या प्रमाणात वाहतूक हे सुद्धा कदाचित शक्य होईल. अवकाश हे पृथ्वीचाच एक विस्तार असल्याप्रमाणे बनेल- जो केवळ सरकारेच नव्हे तर खासगी संस्था आणि व्यक्तींसाठीदेखील एक आखाडा असेल. पण हे वचन सत्यात उतरवण्यासाठी, शांततेच्या काळात तसेच गरज पडल्यास युद्धाच्या काळात देखील अवकाश नियमनासाठी जगाला एखादी कायदेशीर यंत्रणा निर्माण करावी लागेल. अवकाशाच्या विकासामध्ये आजपर्यंत खाली जमिनीवरील गोष्टी सुकर करण्यावर भर राहिला आहे जसे की प्रसारण आणि नेव्हिगेशनसाठी प्रामुख्याने दळणवळण उपग्रह. पण आता दोन गोष्टी बदलत आहेत. पहिली, जिओपॉलिटिक्समुळे माणसांना पृथ्वीचा खालच्या कक्षेच्या पलीकडे पाठवण्यासाठी दबाव वाढत आहे. २०३५ पर्यंत चंद्रावर माणसे पाठवायची चीनची योजना आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारलाही २०२४ पर्यंत पुन्हा अमेरिकन लोकांना तिथे पाठवायचे आहे. किमती कमी झाल्यामुळे हा दिखाऊपणा आता पूर्वीपेक्षा अधिक परवडणारा आहे. अपोलोला शेकडो बिलियन डॉलर्स (आजच्या किमतीत) लागले होते. आता ते दोन अंकी बिलियन डॉलर्समध्ये शक्य आहे [ … ] एका कल्पनारम्य वाईल्ड वेस्टच्या स्वरूपात, म्हणजेच एक असा अराजकीय सीमाप्रदेश जिथे माणूस स्वतःच्या सगळ्या बेड्या फेकून देऊन नव्याने त्याचे नशीब आजमावू शकतो, अवकाशाचा प्रसार करणे चुकीचे आहे. अवकाशाच्या संभाव्यतांच्या पूर्ततेसाठी शासनाची आवश्यकता आहे. मात्र एका अशा काळात जेव्हा जग साध्या स्टीलच्या सळ्या आणि सोयाबीनच्या भूव्यापाराच्या नियमांबाबत सहमत होऊ शकत नाही, तिथे हे खूपच अवघड आव्हान आहे. मात्र त्याशिवाय, पृथ्वीच्या पल्याड जे काही आहे त्याच्या संभाव्यतांच्या पूर्ततेसाठी आणखी ५० वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. वाईटात वाईट म्हणजे अवकाश पृथ्वीवरच्या समस्यांमध्ये आणखी भर घालू शकते. | Entry #27661 — Discuss 0 — Variant: Marathi
|
नील आर्मस्ट्राँग यांनी ५० वर्षांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर पाय ठेवला तेव्हा तो क्षण जगासाठी विस्मयकारी होता तसेच, त्याचा जगाला अभिमान होता. या वृत्तमानपत्राने असे सांगितले की, “मनुष्य त्याच्या इच्छेने ब्रम्हांडामध्ये कुठेही जाऊ शकतो, त्याची क्षमता त्याला कोणत्याही ग्रहाकडे नंतर घेऊन जाण्यापेक्षा आता घेऊन जाऊ शकते.” पण नाही, चंद्रावर उतरणे हे फक्त एक ध्येय नव्हते तर अमेरिकेची विलक्षण क्षमता दाखवण्याचे एक साधन होते. आणि ते ध्येय साध्य केल्यावर ते पुन्हा करण्याची आवश्यकता नव्हती. आता पर्यंत फक्त ५७१ जण अवकाश कक्षेमध्ये गेली आहेत आणि सन १९७२ नंतर कोणीही शिकागो ते दे मॉइन इतक्या कमी अंतराचा अंतराळ प्रवास देखील केलेला नाही. पुढील ५० वर्षे खूप बदल दिसतील. कमी होणारा खर्च, नवीन तंत्रज्ञान, चीन आणि भारताच्या महत्त्वकांक्षा आणि उद्योजकांची नवी पिढी या सर्व गोष्टी अंतराळ विकासाचे शाश्वत वचन देतात. यामध्ये सर्वांसाठी सुधारित आणि उत्तम कम्युनिकेशन नेटवर्कचा समावेश असेल आणि पुढील काही वर्षांनंतर याचा वापर खनिजांचा शोध घेणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक करणे यासाठी देखील करता येवू शकतो. फक्त सरकारांसाठीच नाही तर अनेक खाजगी कंपन्या आणि व्यक्ती यांच्यासाठी पृथ्वीप्रमाणेच अंतराळ देखील एक आखाडा होईल. पण असे होऊ नये यासाठी सर्वच देशांनी अंतराळामध्ये शांततेच्या आणि युद्धाच्या काळामध्ये शांतता टिकवून ठेवण्याकरिता एक प्रणाली तयार करण्याची आवश्यकता आहे. आता पर्यंत अंतराळामधील विकासाचे मुख्य लक्ष म्हणजे ब्रॉडकास्ट आणि नेव्हिगेशन करण्यासाठी सेटलाइट कॉम्यूनिकेशनमध्ये सुधार करणे होते. पण आता गोष्टी बदलत आहेत. आता पहिले उद्दिष्ट हे आहे की मानवाला पृथ्वी कक्षेबाहेर पाठवणे. चीन २०३५ पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखत आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन २०२४ पर्यंत अमेरिकन लोकांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याचा विचारत आहेत. कमी होणाऱ्या खर्चामुळे हे सर्व करणे अधिक सोपे झाले आहे. अपोलो मिशनच्या वेळी आलेला खर्च हा आजच्या स्वरुपामध्ये सांगितल्यास तो शेकडो अब्ज डॉलर होईल पण आता त्यासाठी लागणारा खर्च दहा अब्ज डॉलर पर्यंत कमी झाली आहे. [ … ] पण अंतराळाला लोकांसमोर चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. लोकांना असे भासवण्यात आले आहे की, ही एक अशी जागा आहे जिथे लोक त्यांचे भाग्य बदलू शकतात आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. जेव्हा जगाचे स्टील आणि सोयाबीन यांसारख्या साध्या गोष्टींच्या व्यापार नियमांवर एकमत होऊ शकत नाही तेव्हा याचा विचार दूरच ठेवलेला बरा. पण त्याशिवाय, पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या सर्व गोष्टींची संभाव्यता पूर्ण करण्यासाठी आणखी ५० वर्षे प्रतिक्षा करावी लागेल. सर्वात वाईट म्हणजे, अंतराळामुळे पृथ्वीच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. | Entry #27473 — Discuss 0 — Variant: standard
|
वर्षांपूर्वी, नील आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर पाय ठेवला तो क्षण जगभर विस्मय, अभिमान आणि आश्चर्य वाटले. या वर्तमानपत्राने असा युक्तिवाद केला आहे की “मनुष्य या दिवसापासून विश्वातील कोणासही त्याच्या मनाने पाहिजे तिकडे जाऊ शकतो आणि त्याची चातुर्य ग्रहणात… ग्रहांकडे जाऊ शकते, मानवांना आता जाणे निश्चित झाले आहे.” पण नाही. चंद्र लँडिंग ही एक विरक्ती होती, हे लक्ष्य स्वतःमध्येच नव्हे तर अमेरिकेच्या विलक्षण क्षमता दर्शविण्याचे साधन म्हणून साध्य केले गेले. एकदा तो बिंदू बनल्यानंतर रीमेक करणे आवश्यक नव्हते. केवळ 571 लोक कक्षामध्ये गेले आहेत; आणि १ 2 2२ पासून डेस मोइनेस शिकागोच्या जागी जास्त कोणीही अंतराळात प्रवास केला नाही. पुढील 50 वर्षे खूप भिन्न दिसतील. घसरण खर्च, नवीन तंत्रज्ञान, चीनी आणि भारतीय महत्वाकांक्षा आणि उद्योजकांची एक नवीन पिढी अंतराळ विकासाच्या ठळक काळाचे वचन देते. समृद्ध आणि सर्वांसाठी उत्तम संप्रेषण नेटवर्कसाठी हे जवळजवळ निश्चितच पर्यटनास सामिल करेल; दीर्घकाळ यात खनिज शोषण आणि अगदी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा समावेश असू शकतो. अवकाश हे पृथ्वीच्या विस्तारासारखे होईल - केवळ सरकार नव्हे तर कंपन्या आणि खासगी व्यक्तींचा आखाडा. परंतु हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी जगाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि युद्धाच्या वेळी, जगावर राज्य करण्यासाठी कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत जागेच्या विकासासाठी खाली क्रियाकलाप खाली केंद्रित करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे - मुख्यत: प्रसारण आणि सुचालन यासाठी उपग्रह संप्रेषण. आता दोन गोष्टी बदलत आहेत. प्रथम, भू-पॉलिटिक्स मानवांना निम्न-पृथ्वीच्या कक्षाच्या पलीकडे पाठविण्यासाठी नवीन दबाव आणत आहे. २० 20 by पर्यंत चीन चंद्रावर लोक उतरण्याची चीनची योजना आहे. २० Donald२ पर्यंत अमेरिकेत परत यावं अशी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची इच्छा आहे. पडत्या खर्चामुळे हे पूर्वीच्या तुलनेत अधिक परवडणारे होते. अपोलोची शेकडो अब्ज डॉलर्स (आजच्या पैशात) किंमत आहे. आता अब्जावधी तिकिटांची किंमत आहे. […] रोमँटिझाइड वाईल्ड वेस्ट, अराजक सीमारेषेच्या रूपात जागेची जाहिरात करणे ही एक चूक आहे जिथे मानवता आपले खोटे टाकू शकते आणि तिचे भविष्य पुन्हा शोधू शकते. आपले वचन पूर्ण करण्यासाठी जागेसाठी प्रशासनाची आवश्यकता आहे. अशा वेळी जेव्हा स्टील बार आणि सोयाबीनच्या पार्थिव व्यापाराच्या नियमांवर जगाशी सहमत नसते तेव्हा कदाचित असे विचारता येईल. परंतु त्याशिवाय पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या सर्व गोष्टींच्या संभाव्यतेसाठी आणखी 50 वर्षे पूर्ण होण्याची प्रतीक्षा होईल. सर्वात वाईट ठिकाणी पृथ्वीच्या समस्या जोडू शकते. | Entry #27941 — Discuss 0 — Variant: Not specified
|